पुस्तकांची काय करायची इच्छा आहे?
उत्तर - पुस्तकांची तुमच्याजवळ राहण्याची इच्छा आहे.
तहान भूक विसरून वासरू काय करते?
उत्तर - तहान भूक विसरून वासरू साऱ्या रान भर हुंदडते.
रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते?
उत्तर - रानात फिरायला मिळावे म्हणून ते कळप सोडून जाते.
लेखिका कोठे राहत होती?
उत्तर - लेखिका कोल्हापूरच्या कळंबा मध्ये रस्त्याला लावून असलेल्या झोपडीत राहत होती.
झोपडीत नेहमी कुबट वास का यायचा?
उत्तर - जमीन सतत ओलसर असल्यामुळे झोपडीत नेहमी कुबट वास यायचा.
वहिनीने लताक्काकडे पैसे का मागितले?
उत्तर - इमीच्या या शाळेत भरायचा सव्वा रुपया वहिनींकडे नव्हता; म्हणून तिने लताक्काकडे पैसे मागितले.
दादा इमीला बाबांबरोबर पाठवायला का तयार नव्हता?
उत्तर - दादाला ईमीला शाळेत घालायचे होते; म्हणून तो तिला आई बाबांवर पाठवायला तयार नव्हता.
लेखिकेचे आई-बाबा कुठे जायची तयारी करीत?
उत्तर - लेखिकेचे आई-वडील बोरगावला जायची तयारी करीत होते.
संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली?
उत्तर - संगीताला उत्तेजन देण्यासाठी राज्यात सगळ्यांनी गाणे बोलायचे ही आज्ञा केली.
कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या?
उत्तर - पावसाळा कोरडा गेल्यामुळे कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या.
लोक शाहू महाराजांविषयी काय बोलू लागले?
उत्तर - 'इतका चांगला राजा मिळाला नि आता अस्मानी संकट आलं' असे लोक शाहू महाराजांविषयी बोलू लागले.
पाण्याच्या प्रश्नासंबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला?
उत्तर - महाराजांनी 'विहिरीतला गाळ काढा. विहिरी खोदा. दरबारातून लागेल तेवढा खर्च करा' असा आदेश दिला.
रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी कोणती योजना सुरू केली?
उत्तर - महाराजांनी मुलांसाठी 'शिशुसंगोपन गृह' ही योजना सुरू केली.
कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते?
उत्तर - कापणी मार्गशीर्ष महिन्यात सुरू होते.
पिके कापणीच्या वेळी शेत कसे दिसते?
उत्तर - पिके कापणीच्या वेळी पिवळेधम्मक दिसते.
आदिवासींच्या होळीला किती वर्षांचा इतिहास आहे?
उत्तर - सुमारे आठशे वर्षांचा इतिहास आहे.
ढोलाचा सांगाडा कशापासून तयार केलेला असतो?
उत्तर - ढोलाचा सांगाडा आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून तयार केलेला असतो.
रत्नाच्या घरी पाणी कोणत्या दिवशी येत असे?
उत्तर - रत्नाच्या घरी पाणी मंगळवारी येत असे.
कोरडा दुष्काळ कधी पडतो?
उत्तर - पाऊस कमी पडल्यामुळे कोरडा दुष्काळ पडतो.
संत नामदेव श्रीविठ्ठल येऊन आपल्याला कधी भेटतो म्हणतात?
उत्तर - जेव्हा मनात प्रेम शुद्ध भावना असेल तेव्हा विठ्ठल येऊन भेटतो असे संत नामदेव म्हणतात.
आमश्याच्या डोलीजवळ कथा कोणी लावली?
उत्तर - आमश्याच्या डोलीजवळ जंगल्या भगत याने कथा लावली.
सातपुडा डोंगराच्या परिसरातील होलीकोत्सवाची सुरुवात कधी व कशाने होते?
उत्तर - माघ पौर्णिमेला दांडा पूजनाने होते.
रगडणी करण्यासाठी काय तयार करावे लागते?
उत्तर - रगडणी करण्यासाठी खळे तयार करावे लागते.
पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यांपुढे काय उभे राहते?
उत्तर - पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यांपुढे दाण्यांची मोजणी उभी राहते.
कवयित्रीने हिम्मत धरा असे का म्हटले आहे?
उत्तर - कापणी करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात म्हणून.
कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला का सांगितले आहे?
उत्तर - कापणीच्या वेळी उगवलेले धाटे पटकन व लवकर करता यावेत म्हणून.
कवयित्रीने गोफण टाकून हातात काय धरायला सांगितले आहे?
उत्तर - गोफण टाकून हातात विळे धरायला सांगितले आहे.
डोळ्यांवर झोप का आली?
उत्तर - कापलेल्या पिकांची रास लावता लावता थकल्यामुळे.
अख्खा सातपुड्यात ढोल वाजवणे कोण प्रसिद्ध होता?
उत्तर - आमश्या डोहल्या प्रसिद्ध होता.
आमश्याची डोली कशाने सजवण्यात आली?
उत्तर - रानावनातील पानाफुलांनी, पळस फुलांनी सजवण्यात आली.
आमश्या डोहल्याने कोणती शपथ घेतली होती?
उत्तर - आपल्या ढोलाच्या आवाजाने अख्खा सातपुडा दणाणून सोडायची शपथ घेतली होती.
पाण्याची बँक कोणाला म्हटले आहे?
उत्तर - पाण्याची बँक जमिनीला म्हटले आहे
Post a Comment
THANK YOU