Download PDF
एका वाक्यात उत्तरे लिहा pdf प्रश्नपत्रिकेसाठी क्लिक करा .
इयत्ता पाचवी मराठी - एका वाक्यात उत्तर
1) पुस्तकांची काय करायची इच्छा आहे ?
उत्तर - पुस्तकांची तुमच्याजवळ राहण्याची इच्छा आहे.
2) तहान भूक विसरून वासरू काय करते ?
उत्तर - तहान भूक विसरून वासरू साऱ्या रान भर हुंदडते.
3) रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते ?
उत्तर - रानात फिरायला मिळावे म्हणून ते कळप सोडून जाते.
4) लेखिका कोठे राहत होती ?
उत्तर - लेखिका कोल्हापूरच्या कळंबा मध्ये रस्त्याला लावून असलेल्या झोपडीत राहत होती.
5) झोपडीत नेहमी कुबट वास का यायचा ?
उत्तर - जमीन सतत ओलसर असल्यामुळे झोपडीत नेहमी कुबट वास यायचा.
6) वहिनीने लताक्काकडे पैसे का मागितले ?
उत्तर - इमीच्या या शाळेत भरायचा सव्वा रुपया वहिनींकडे नव्हता; म्हणून तिने लताक्काकडे पैसे मागितले.
7) दादा इमीला बाबांबरोबर पाठवायला का तयार नव्हता ?
उत्तर - दादाला ईमीला शाळेत घालायचे होते; म्हणून तो तिला आई बाबांवर पाठवायला तयार नव्हता.
8) लेखिकेचे आई-बाबा कुठे जायचे तयारी करीत ?
उत्तर - लेखिकेचे आई-वडील बोरगावला जायची तयारी करीत होते.
9) संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली ?
उत्तर - संगीताला उत्तेजन देण्यासाठी राज्यात सगळ्यांनी गाणे बोलायचे ही आज्ञा केली.
10) ही नाटिका तुम्हाला वर्गात सादर करायचे आहे त्यासाठी किती मुली लागतील ?
उत्तर - ही नाटिका मला वर्गात सादर करण्यासाठी मुख्य पात्र व इतर दरबारी प्रजाजन वर्गातील सर्व मुले लागतील.
11) कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या ?
उत्तर - पावसाळा कोरडा गेल्यामुळे कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या.
12) लोक शाहू महाराजांविषयी काय बोलू लागले ?
उत्तर - 'इतका चांगला राजा मिळाला नि आता अस्मानी संकट आलं' असे लोक शाहू महाराजांविषयी बोलू लागले.
13) पाण्याच्या प्रश्नासंबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला ?
उत्तर - पाण्याच्या प्रश्नासंबंधी उपाय म्हणून महाराजांनी 'विहिरीतला गाळ काढा. विहिरी खोदा. दरबारातून लागेल तेवढा खर्च करा' असा आदेश दिला.
14) रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी कोणती योजना सुरू केली ?
उत्तर - रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी 'शिशुसंगोपन गृह' ही योजना सुरू केली.
15) कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते ?
उत्तर - कापणी मार्गशीर्ष महिन्यात सुरू होते.
16) रगडणी करण्यासाठी काय तयार करावे लागते ?
उत्तर - रगडणी करण्यासाठी खळे तयार करावे लागते.
17) पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यांपुढे काय उभे राहते ?
उत्तर - पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यांपुढे दाण्यांची मोजणी उभी राहते.
18) पिके कापणीच्या वेळी शेत कसे दिसते ?
उत्तर - पिके कापणीच्या वेळी पिवळेधम्मक दिसते.
19) कवयित्रीने 'हिम्मत धरा' असे का म्हटले आहे ?
उत्तर - कापणी करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात म्हणून कवयित्रीने 'हिम्मत धरा' असे म्हटले आहे.
20) कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला का सांगितले आहे ?
उत्तर - कापणीच्या वेळी उगवलेले धाटे पटकन व लवकर करता यावेत म्हणून कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला सांगितले आहे.
21) कवयित्रीने गोफण टाकून हातात काय धरायला सांगितले आहे ?
उत्तर - कवयत्रीने गोफन टाकून हातात विळे धरायला सांगितले आहे.
22) डोळ्यांवर झोप का आली ?
उत्तर - कापलेल्या पिकांची रास लावता लावता थकल्यामुळे डोळ्यांवर झोप आली.
23) आदिवासींच्या होळीला किती वर्षांचा इतिहास आहे ?
उत्तर - आदिवासींच्या होळीला सुमारे आठशे वर्षांचा इतिहास आहे.
24) अख्खा सातपुड्यात ढोल वाजवणे कोण प्रसिद्ध होता ?
उत्तर - अख्खा सातपुड्या ढोल वाजवण्यात आमश्या डोहल्या प्रसिद्ध होता.
25) ढोलाचा सांगाडा कशापासून तयार केलेला असतो ?
उत्तर - ढोलाचा सांगाडा आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून तयार केलेला असतो.
26) आमश्याच्या डोलीजवळ कथा कोणी लावली ?
उत्तर - आमश्याच्या डोलीजवळ जंगल्या भगत याने कथा लावली.
27) आमश्याची डोली कशाने सजवण्यात आली ?
उत्तर - रानावनातील पानाफुलांनी, पळस फुलांनी आमश्याची डोली सजवण्यात आली.
28) सातपुडा डोंगराच्या परिसरातील होलीकोत्सवाची सुरुवात कधी व कशाने होते ?
उत्तर - सातपुडा डोंगराच्या परिसरातील होलिकोत्सवाची सुरुवात माघ पौर्णिमेला दांडा पूजनाने होते.
29) आमश्या डोहल्याने कोणती शपथ घेतली होती ?
उत्तर - यंदाच्या होळीत आपल्या ढोलाच्या आवाजाने अख्खा सातपुडा दणाणून सोडून अशी शपथ घेतली होती.
30) रत्नाच्या घरी पाणी कोणत्या दिवशी येत असे ?
उत्तर - रत्नाच्या घरी पाणी मंगळवारी येत असे.
31) कोरडा दुष्काळ कधी पडतो ?
उत्तर - पाऊस कमी पडल्यामुळे कोरडा दुष्काळ पडतो.
32) पाण्याची बँक कोणाला म्हटले आहे ?
उत्तर - पाण्याची बँक जमिनीला म्हटले आहे.
33) संत नामदेव श्रीविठ्ठल येऊन आपल्याला कधी भेटतो म्हणतात ?
उत्तर - जेव्हा मनात प्रेम व शुद्ध भावना असेल तेव्हा विठ्ठल येऊन भेटतो असे संत नामदेव म्हणतात.
Post a Comment
THANK YOU