पुस्तकांची काय करायची इच्छा आहे?
उत्तर: पुस्तकांची तुमच्याजवळ राहण्याची इच्छा आहे.
तहान भूक विसरून वासरू काय करते?
उत्तर: तहान भूक विसरून वासरू साऱ्या रानभर हुंदडते.
रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते?
उत्तर: रानात फिरायला मिळावे म्हणून ते कळप सोडून जाते.
लेखिका कोठे राहत होती?
उत्तर: लेखिका कोल्हापूरच्या कळंबा येथे झोपडीत राहत होती.
झोपडीत नेहमी कुबट वास का यायचा?
उत्तर: जमीन सतत ओलसर असल्यामुळे झोपडीत कुबट वास यायचा.
वहिनीने लताक्काकडे पैसे का मागितले?
उत्तर: इमीच्या शाळेच्या फी साठी पैसे मागितले.
दादा इमीला बाबांबरोबर पाठवायला का तयार नव्हता?
उत्तर: दादाला इमीला शाळेत घालायचे होते.
लेखिकेचे आई-बाबा कुठे जायची तयारी करत होते?
उत्तर: बोरगावला जायची तयारी करत होते.
संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने काय आज्ञा केली?
उत्तर: राज्यात सगळ्यांनी गाणे बोलायचे अशी आज्ञा केली.
ही नाटिका वर्गात सादर करण्यासाठी किती मुली लागतील?
उत्तर: मुख्य पात्र व इतर दरबारी, सर्व मुले लागतील.
कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा का पडू लागल्या?
उत्तर: पावसाळा कोरडा गेल्यामुळे.
लोक शाहू महाराजांविषयी काय बोलू लागले?
उत्तर: 'इतका चांगला राजा मिळाला नि आता अस्मानी संकट आलं.'
पाण्याच्या प्रश्नावर शाहू महाराजांनी कोणता आदेश दिला?
उत्तर: विहिरी खोदाव्यात, गाळ काढावा आणि खर्च दरबारातून करावा.
रोजगार हमीच्या ठिकाणी मुलांसाठी काय योजना सुरू केली?
उत्तर: शिशुसंगोपन गृह योजना.
कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते?
उत्तर: मार्गशीर्ष महिन्यात.
रगडणी करण्यासाठी काय तयार करावे लागते?
उत्तर: खळे तयार करावे लागतात.
पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यांपुढे काय उभे राहते?
उत्तर: दाण्यांची मोजणी उभी राहते.
कापणीच्या वेळी शेत कसे दिसते?
उत्तर: पिवळेधम्मक दिसते.
कवयित्रीने 'हिम्मत धरा' असे का म्हटले?
उत्तर: कारण कापणीसाठी खूप कष्ट करावे लागतात.
विळ्यांना धार लावून ठेवायला का सांगितले आहे?
उत्तर: धाटे पटकन व लवकर कापता यावेत म्हणून.
गोफण टाकून हातात काय धरायला सांगितले आहे?
उत्तर: विळे धरायला सांगितले आहे.
डोळ्यांवर झोप का आली?
उत्तर: रास लावताना थकल्यामुळे.
आदिवासींच्या होळीला किती वर्षांचा इतिहास आहे?
उत्तर: सुमारे आठशे वर्षांचा इतिहास आहे.
ढोल वाजवण्यात कोण प्रसिद्ध होता?
उत्तर: आमश्या डोहल्या प्रसिद्ध होता.
ढोलाचा सांगाडा कशापासून तयार होतो?
उत्तर: आंबा किंवा सागाच्या लाकडापासून.
आमश्याच्या डोलीजवळ कथा कोणी लावली?
उत्तर: जंगल्या भगत याने.
डोली कशी सजवली गेली?
उत्तर: रानावनातील फुलांनी व पानांनी.
सातपुडा परिसरातील होळीची सुरुवात कधी होते?
उत्तर: माघ पौर्णिमेला दांडा पूजनाने.
आमश्या डोहल्याने कोणती शपथ घेतली होती?
उत्तर: ढोलाच्या आवाजाने अख्खा सातपुडा दणाणून सोडायची.
रत्नाच्या घरी पाणी कोणत्या दिवशी येत असे?
उत्तर: मंगळवारी.
कोरडा दुष्काळ कधी पडतो?
उत्तर: पाऊस कमी पडल्यामुळे.
पाण्याची बँक कोणाला म्हटले आहे?
उत्तर: जमिनीला.
संत नामदेव म्हणतात, श्रीविठ्ठल आपल्याला कधी भेटतो?
उत्तर: जेव्हा मनात प्रेम व शुद्ध भावना असते तेव्हा.
Post a Comment
THANK YOU