पुस्तकांची काय करायची इच्छा आहे?
पुस्तकांची तुमच्याजवळ राहण्याची इच्छा आहे.
तहान भूक विसरून वासरू काय करते?
तहान भूक विसरून वासरू साऱ्या रानभर हुंदडते.
रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते?
रानात फिरायला मिळावे म्हणून ते कळप सोडून जाते.
लेखिका कोठे राहत होती?
लेखिका कोल्हापूरच्या कळंबा मध्ये रस्त्याला लावून असलेल्या झोपडीत राहत होती.
झोपडीत नेहमी कुबट वास का यायचा?
जमीन सतत ओलसर असल्यामुळे झोपडीत नेहमी कुबट वास यायचा.
वहिनीने लताक्काकडे पैसे का मागितले?
इमीच्या शाळेत भरायचा सव्वा रुपया वहिनींकडे नव्हता; म्हणून तिने लताक्काकडे पैसे मागितले.
दादा इमीला बाबांबरोबर पाठवायला का तयार नव्हता?
दादाला ईमीला शाळेत घालायचे होते; म्हणून तो तिला आईबाबांवर पाठवायला तयार नव्हता.
लेखिकेचे आई-बाबा कुठे जायची तयारी करीत?
लेखिकेचे आई-वडील बोरगावला जायची तयारी करीत होते.
संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली?
संगीताला उत्तेजन देण्यासाठी राज्यात सगळ्यांनी गाणे बोलायचे ही आज्ञा केली.
कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या?
पावसाळा कोरडा गेल्यामुळे कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या.
लोक शाहू महाराजांविषयी काय बोलू लागले?
'इतका चांगला राजा मिळाला नि आता अस्मानी संकट आलं' असे लोक शाहू महाराजांविषयी बोलू लागले.
पाण्याच्या प्रश्नासंबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला?
महाराजांनी 'विहिरीतला गाळ काढा. विहिरी खोदा दरबारातून लागेल तेवढा खर्च करा' असा आदेश दिला.
रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी कोणती योजना सुरू केली?
मुलांसाठी 'शिशुसंगोपन गृह' ही योजना सुरू केली.
कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते?
कापणी मार्गशीर्ष महिन्यात सुरू होते.
पिके कापणीच्या वेळी शेत कसे दिसते?
पिके कापणीच्या वेळी पिवळेधम्मक दिसते.
आदिवासींच्या होळीला किती वर्षांचा इतिहास आहे?
सुमारे आठशे वर्षांचा इतिहास आहे.
ढोलाचा सांगाडा कशापासून तयार केलेला असतो?
आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून तयार केलेला असतो.
रत्नाच्या घरी पाणी कोणत्या दिवशी येत असे?
मंगळवारी येत असे.
कोरडा दुष्काळ कधी पडतो?
पाऊस कमी पडल्यामुळे कोरडा दुष्काळ पडतो.
संत नामदेव श्रीविठ्ठल येऊन आपल्याला कधी भेटतो म्हणतात?
जेव्हा मनात प्रेम व शुद्ध भावना असेल तेव्हा.
आमश्याच्या डोलीजवळ कथा कोणी लावली?
जंगल्या भगत याने.
सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळीकोत्सवाची सुरुवात कधी व कशाने होते?
माघ पौर्णिमेला दांडा पूजनाने.
रगडणी करण्यासाठी काय तयार करावे लागते?
खळे तयार करावे लागतात.
पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यांपुढे काय उभे राहते?
दाण्यांची मोजणी उभी राहते.
कवयित्रीने हिम्मत धरा असे का म्हटले आहे?
कापणीसाठी खूप कष्ट करावे लागतात म्हणून.
कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला का सांगितले आहे?
धाटे पटकन कापता यावेत म्हणून.
कवयित्रीने गोफण टाकून हातात काय धरायला सांगितले आहे?
विळे धरायला सांगितले आहे.
डोळ्यांवर झोप का आली?
पिकांची रास लावताना थकल्यामुळे.
अख्खा सातपुड्यात ढोल वाजवणे कोण प्रसिद्ध होता?
आमश्या डोहल्या प्रसिद्ध होता.
आमश्याची डोली कशाने सजवण्यात आली?
रानावनातील पानाफुलांनी व पळस फुलांनी.
आमश्या डोहल्याने कोणती शपथ घेतली होती?
ढोलाच्या आवाजाने अख्खा सातपुडा दणाणून सोडायची शपथ.
पाण्याची बँक कोणाला म्हटले आहे?
जमिनीला.
गवताळ प्रदेशात कोण राहतात?
झुलु, हौसा, मसाई जमातीचे लोक.
शेतीसाठी भूजल कसे मिळवले जाते?
विहिरी, कूपविहिरी, तलाव खणून.
शीत पट्ट्यातील नैसर्गिक प्रदेश कोणते?
टुंड्रा व तैगा प्रदेश.
त्से-त्से माश्या कोणत्या प्रदेशात आढळतात?
विषुववृत्तीय प्रदेशात.
ह्युमस म्हणजे काय?
मृदेतील विघटित जैविक पदार्थ.
संपात दिनाला कोणत्या ध्रुवावर सूर्योदय होतो?
21 मार्च रोजी उत्तर ध्रुवावर.
22 डिसेंबर नंतर सूर्यास्ताचे स्थान कोणत्या दिशेला सरकते?
उत्तर दिशेला.
पेंग्विन उत्तर ध्रुवावर का नाही?
ते केवळ दक्षिण ध्रुवावरच वास्तव्य करतात.
समोच्चता रेषा म्हणजे काय?
समान उंचीच्या ठिकाणांना जोडणारी नकाशातील रेषा.
PDF Download साठी पुढे क्लिक करा 👉👉👉👉👉👉
Post a Comment
THANK YOU