• पुस्तकांची काय करायची इच्छा आहे?
    पुस्तकांची तुमच्याजवळ राहण्याची इच्छा आहे.

  • तहान भूक विसरून वासरू काय करते?
    तहान भूक विसरून वासरू साऱ्या रानभर हुंदडते.

  • रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते?
    रानात फिरायला मिळावे म्हणून ते कळप सोडून जाते.

  • लेखिका कोठे राहत होती?
    लेखिका कोल्हापूरच्या कळंबा मध्ये रस्त्याला लावून असलेल्या झोपडीत राहत होती.

  • झोपडीत नेहमी कुबट वास का यायचा?
    जमीन सतत ओलसर असल्यामुळे झोपडीत नेहमी कुबट वास यायचा.

  • वहिनीने लताक्काकडे पैसे का मागितले?
    इमीच्या शाळेत भरायचा सव्वा रुपया वहिनींकडे नव्हता; म्हणून तिने लताक्काकडे पैसे मागितले.

  • दादा इमीला बाबांबरोबर पाठवायला का तयार नव्हता?
    दादाला ईमीला शाळेत घालायचे होते; म्हणून तो तिला आईबाबांवर पाठवायला तयार नव्हता.

  • लेखिकेचे आई-बाबा कुठे जायची तयारी करीत?
    लेखिकेचे आई-वडील बोरगावला जायची तयारी करीत होते.

  • संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजाने कोणती आज्ञा केली?
    संगीताला उत्तेजन देण्यासाठी राज्यात सगळ्यांनी गाणे बोलायचे ही आज्ञा केली.

  • कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या?
    पावसाळा कोरडा गेल्यामुळे कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या.

  • लोक शाहू महाराजांविषयी काय बोलू लागले?
    'इतका चांगला राजा मिळाला नि आता अस्मानी संकट आलं' असे लोक शाहू महाराजांविषयी बोलू लागले.

  • पाण्याच्या प्रश्नासंबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला?
    महाराजांनी 'विहिरीतला गाळ काढा. विहिरी खोदा दरबारातून लागेल तेवढा खर्च करा' असा आदेश दिला.

  • रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी कोणती योजना सुरू केली?
    मुलांसाठी 'शिशुसंगोपन गृह' ही योजना सुरू केली.

  • कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते?
    कापणी मार्गशीर्ष महिन्यात सुरू होते.

  • पिके कापणीच्या वेळी शेत कसे दिसते?
    पिके कापणीच्या वेळी पिवळेधम्मक दिसते.

  • आदिवासींच्या होळीला किती वर्षांचा इतिहास आहे?
    सुमारे आठशे वर्षांचा इतिहास आहे.

  • ढोलाचा सांगाडा कशापासून तयार केलेला असतो?
    आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून तयार केलेला असतो.

  • रत्नाच्या घरी पाणी कोणत्या दिवशी येत असे?
    मंगळवारी येत असे.

  • कोरडा दुष्काळ कधी पडतो?
    पाऊस कमी पडल्यामुळे कोरडा दुष्काळ पडतो.

  • संत नामदेव श्रीविठ्ठल येऊन आपल्याला कधी भेटतो म्हणतात?
    जेव्हा मनात प्रेम व शुद्ध भावना असेल तेव्हा.

  • आमश्याच्या डोलीजवळ कथा कोणी लावली?
    जंगल्या भगत याने.

  • सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळीकोत्सवाची सुरुवात कधी व कशाने होते?
    माघ पौर्णिमेला दांडा पूजनाने.

  • रगडणी करण्यासाठी काय तयार करावे लागते?
    खळे तयार करावे लागतात.

  • पिके कापायला आल्यानंतर कवयित्रीच्या डोळ्यांपुढे काय उभे राहते?
    दाण्यांची मोजणी उभी राहते.

  • कवयित्रीने हिम्मत धरा असे का म्हटले आहे?
    कापणीसाठी खूप कष्ट करावे लागतात म्हणून.

  • कवयित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला का सांगितले आहे?
    धाटे पटकन कापता यावेत म्हणून.

  • कवयित्रीने गोफण टाकून हातात काय धरायला सांगितले आहे?
    विळे धरायला सांगितले आहे.

  • डोळ्यांवर झोप का आली?
    पिकांची रास लावताना थकल्यामुळे.

  • अख्खा सातपुड्यात ढोल वाजवणे कोण प्रसिद्ध होता?
    आमश्या डोहल्या प्रसिद्ध होता.

  • आमश्याची डोली कशाने सजवण्यात आली?
    रानावनातील पानाफुलांनी व पळस फुलांनी.

  • आमश्या डोहल्याने कोणती शपथ घेतली होती?
    ढोलाच्या आवाजाने अख्खा सातपुडा दणाणून सोडायची शपथ.

  • पाण्याची बँक कोणाला म्हटले आहे?
    जमिनीला.

  • गवताळ प्रदेशात कोण राहतात?
    झुलु, हौसा, मसाई जमातीचे लोक.

  • शेतीसाठी भूजल कसे मिळवले जाते?
    विहिरी, कूपविहिरी, तलाव खणून.

  • शीत पट्ट्यातील नैसर्गिक प्रदेश कोणते?
    टुंड्रा व तैगा प्रदेश.

  • त्से-त्से माश्या कोणत्या प्रदेशात आढळतात?
    विषुववृत्तीय प्रदेशात.

  • ह्युमस म्हणजे काय?
    मृदेतील विघटित जैविक पदार्थ.

  • संपात दिनाला कोणत्या ध्रुवावर सूर्योदय होतो?
    21 मार्च रोजी उत्तर ध्रुवावर.

  • 22 डिसेंबर नंतर सूर्यास्ताचे स्थान कोणत्या दिशेला सरकते?
    उत्तर दिशेला.

  • पेंग्विन उत्तर ध्रुवावर का नाही?
    ते केवळ दक्षिण ध्रुवावरच वास्तव्य करतात.

  • समोच्चता रेषा म्हणजे काय?
    समान उंचीच्या ठिकाणांना जोडणारी नकाशातील रेषा.

  • PDF Download साठी पुढे क्लिक करा 👉👉👉👉👉👉

  • Download 



  • Post a Comment

    THANK YOU

    Previous Post Next Post